महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडू : किरीट सोमय्या


मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.


महाराष्ट्रात आम्ही लव्ह जिहाद होऊ देणार नाही.  युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असं किरीट सोमय्या म्हणाले.


लव्ह जिहादवर बोलताना किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता, फेनेटीक इस्लामिकऑरगनाझेशन संघटनेचं समर्थन केलं होतं. मात्र आम्ही महाराष्ट्रात लव्ह जिहाद होऊ देणार नाही”, असं सोमय्या म्हणाले.


किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलाही टार्गेट केलं. “सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला. अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात”, अशी टीका सोमय्यांनी केली. यूपी सरकारने केलेल्या कायद्यानुसार महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा. विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image