शालेय पुस्तकांची आणि पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राची परवानगी

शालेय पुस्तकांची आणि पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राची परवानगी



नवी दिल्ली


 टाळेबंदीनंतर करोनाच्या रुग्णांमध्ये १६ पटीने वाढ झाली. मात्र, नमुना चाचणीचे प्रमाणही २४ पटीने वाढवण्यात आले. चाचण्यांमध्ये वाढ करूनही रुग्णांमध्ये होणारी वाढ तुलनेत कमी आहे. या पार्श्वभूमीवर शालेय पुस्तकांची दुकाने, पंख्याची दुकाने सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. तसेच, नाविकांना ये-जा करण्यासही अनुमती देण्यात आली असून, फलोत्पादन विषयक कामांनाही परवानगी मिळाली आहे.   गेल्या २८ दिवसांमध्ये १२ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. आठ नवे जिल्हे करोनामुक्त झाले आहेत. ७८ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून एकही रुग्ण सापडलेला नाही. गेल्या २४ तासांमध्ये १,४०९ नव्या रुग्णांची भर पडली असून, ३८८ रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णांची संख्या २१,३९३ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४१ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू ६८१ झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image