टाळेबंदी लागू करण्यात चूक झाल्याबद्दल दोन अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने केले निलंबित

टाळेबंदी लागू करण्यात चूक झाल्याबद्दल दोन अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने केले निलंबित



नवी दिल्ली


केंद्राने राज्य सरकारांना सीमाबंद करण्याचा आदेश दिलेला असून रोजंदारी मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची सोयही करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीहून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या हजारो मजुरांसाठी गेले दोन दिवस उत्तर प्रदेश सरकारने बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्या. मात्र, टाळेबंदी लागू करण्यात चूक झाल्याबद्दल दिल्लीच्या वाहतूक खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव या दोन अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने निलंबित केले.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर २१ दिवसांची टाळेबंदी लागू केली असून, ही कालमर्यादा आणखी वाढवणार नाही. तसेच टाळेबंदीच्या काळात सर्व बँकांच्या शाखा, एटीएम सुरू राहतील, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. या दोन्ही मुद्दय़ांबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवून नये, असे आवाहनही सरकारने केले.


देशभरात ठिकठिकाणी मजूर आपापल्या गावी जात असल्याचे चित्र असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून टाळेबंदीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अशी कोणतीही शक्यता नसल्याचे जाहीर केले. अफवा पसरवल्या जात असून टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सांगितले.


 


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image