जिल्हा परिषद कृषी  विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन

जिल्हा परिषद कृषी  विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन


ठाणे 


 ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या शेतीकामाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद कृषी  विभागाकडून खते, बियाणे, व किटकनाशकांचे नियोजन करण्यात आले आहे.  यंदाच्या हंगामात जिल्ह्यासाठी भात बियाणांची गरज १० हजार ६७०  क्विंटल एवढी असून आज रोजी १०  हजार ९७३ क्विंटल बियाणे उपल्बध झाले आहे. तर युरिया खताची आवश्कता ४ हजार ४४१ मेट्रिक टन असून आज अखेर ४ हजार ४७४ मेट्रिक टन इतके खत जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीसाठी मुबलक बियाणे व खते उपलब्ध आहेत असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.


ठाणे जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र हे ५९ हजार २७९ हेक्टर आहे. तर नाचणी पिकाखालील ३ हजार ३७८ हेक्टर क्षेत्र आहे. त्याचबरोबर वरी पिकाखालील ९१६.१२ हेक्टर क्षेत्र  असून भाजीपाला व कडधान्य पिकसहित खरीप हंगामाखालील एकूण क्षेत्र हे ६७ हजार ४४३ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. जिल्ह्यातील शेतकरी जास्त प्रमाणात भात पिकाची लागवड करत असून यंदा भात पिकासाठी आवश्यक असणारे बियाणे आणि खते मागणीपेक्षा अधिक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खते, बियाणे उपलब्ध होणार आहेत. तसेच मुबलक प्रमाणात कीटकनाशक व बुरशीनाशकाचा साठा उपलब्ध आहे.



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image