पोलीस ठाण्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप
ठाणे
गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राबोडी, चितळसर-मानपाडा,कापूरबावडी, वर्तक नगर, श्रीनगर,नौपाडा,कासारवडवली, पोलीस ठाण्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. या अभियानामध्ये शेखर भालेराव, कैलास राठोड, समीर पेंढारे, जतिन कोठारे, किशोर राठोड, राजनाथ सिंह,गौतम मोरे, संदेश पाटील, तुळशीराम म्हात्रे,लतेश सावळ, हरीश वैती, अक्षय यादव, संदीप येताळ, कौस्तुभ धुमाळ, अभिषेक पुसाळकर, संकेत नारणे, रत्नेश दुबे, शिवा कालुसिंह, रोहित भंडारी, महेश भाग्यवंत, नौपाडा ब्लाॅक अध्यक्ष निलेश कदम, ठाणे विधानसभा युवाध्यक्ष दीपक पाटील, सुमीत गुप्ता, कल्पेश मिठबावकर, लखबीरसिंग गिल आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. हे अभियान लाॅकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.