अखेर राज्य सरकारने घेतला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय

आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना वैद्यकीय प्रशिक्षण


अखेर राज्य सरकारने घेतला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय 



मुंबईः


. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे.मी सर्वाना काळजीपोटीच आपल काळजीपोटीच आपल्याला या सूचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करुनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला


करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तुटवडा भासू नये यासाठी आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  “जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री, उद्योगमंत्री यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिवदेखील होते. संपूर्ण राज्याचा आढावा घेतला. जर वैद्यकीय क्षेत्रात अधिक स्टाफची गरज लागली तर आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. काही ठिकाणी याची सुरुवात देखील करण्यात आली आहे” यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं 


एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कयूं चांगला पाळला. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले. खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे.


जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. खुपदा विनंती करुनही पालन होत नसल्याने मला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे पर्णपणे बंद राहतील. प्रसंगी आशा, अंगणवाडी, होमगार्डस यांना देखील वैदयकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन तयार करीत आहोत. सर्व माध्यमांना देखील मी धन्यवाद देतो. कोरोनाविषयी आपण चांगली जनजागृती करीत आहात. ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.