मीरा रोड :
मीरा भाईंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा घाट सत्ताधारीभाजपने घातल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्तांची भेट घेतली. महाराजांचा पुतळा हटवण्याचे मनसुबे कोणत्याही स्थितीत शिवसेना हाणून पाडेल असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. आयुक्त चंद्रकांत डांगे यांची सरनाईक, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटीलसभापती तारा घरत, गटनेते हरियचंद्र आमगावकर, नगरसेविका निलमढवणराजू भोईर, स्नेहा पांडे, संध्या पाटीलवंदना पाटील, कसम गुप्ता, दिनेश नलावडे,अर्चना कदम, कमलेशभोईर, दीप्ती भट. भावना भोईर. शर्मिला बगाजी, हेलन गोविंद तसेच पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे, स्नेहल सावंत, विक्रम प्रतापसिंग, शुभांगी कोटीयन, पप्पू भिसे, श्रेया साळवी आदी उपस्थित होते. महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारीभाजप करत असल्याचे बोलले जाते. मात्र महाराजांचा काशिमीरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरीत करण्याचा विचार कुणीही करू नये. असा विचार केला तर त्याला शिवसेनेच्या रूद्रावताराला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. काशिमीरा नाका येथून शहरात मेट्रो येणार आहे. मेट्रो व उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या महाराजांचा पुतळा तेथेचकायम ठेवावा व महाराजांच्या पुतळ्याची उंची किमान २५ फुटांनी वाढवावी. पुतळ्याची उंची वाढवून त्याचे सशोभीकरण करावे घोटबंटर किल्ला सुशोभीकरण करत असताना किल्ल्यात महाराजांचा नवीन पतला बसवावा असेसरनाईक यांनी सांगितले