टोल वसुलीला सुरुवात

टोलवसुलीला सुरुवात



मुंबई


करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं २५ मार्चपासून टोलवसूली तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आजपासून पुन्हा एकटा टोल वसूली सुरू झाली आहे. यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व ट्रक आणि मालवाहू वाहनांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी जी सुट देण्यात आली आहे ती ध्यानात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर योग्य ती कारवाई करावी. तसंच २० एप्रिल २०२० पासून टोलवसूली सुरू करण्यात आली पाहिजे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्राला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि माहमार्ग मंत्रालयानं ११ एप्रिल आणि १४ एप्रिलला एक पत्र लिहिलं होतं. गृह मंत्रालयानं व्यावसायिक आणि खासगी संस्थांनांच्या वाहतुकीसह अन्य कामांसाठी २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केलेल्या टोलवसूलीपासून सरकारला महसूल मिळतो, असंही त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image