गुढी पेक्षा जीवन महत्त्वाचे... 



गुढी पेक्षा जीवन महत्त्वाचे... 



ठाणे


कोरोनाशी लढाई सुरू असल्याने हा गुढीपाडवा जरा वेगळा आहे. सण साजरा करण्यापेक्षा आरोग्य महत्त्वाचे असल्याने मंदिरांमध्ये जाऊन देवाच्या पाया पडण्यापेक्षा स्वत:चा जीव वाचवणे महत्वाचे ठरले आहे. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी वैज्ञानिक अविष्कार अर्थात फोन, सोशल मीडिया याचीच आता साथ लाभत आहे. मुंबई ठाण्यासह विविध ठिकाणी शोभायात्रा निघते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदा कुठेही शोभायात्रा होणार नाही. 


स्वत:च्या भल्यासाठी असले निर्णय घेण्यात आल्याने तो पाळणे महत्त्वाचे आहे, असे अनेकांनी आवर्जून सांगितले. सण साजरा करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी नंतर दसऱ्यालाही विचार करता येईल, असेही सांगण्यात आले. लोकांच्या या घराबाहेर न जाण्याच्या निश्चयाला पाठिंबा दर्शवत अनेकांनी घरी उपलब्ध साहित्यातून गुढी उभारा, असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार होती. मात्र विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती, त्यासाठी आवश्यक काळजी म्हणून ही जनजागृतीही करण्यात येणार नसल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे.





Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image